झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘शुभ श्रावणी’ सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली असून प्रेक्षकांना दररोज नवनवीन धक्के पाहायला मिळत आहेत. मालिकेचं कथानक आता अशा टप्प्यावर आले आहे, जिथे श्रावणीचे प्राण वाचवण्यासाठी नियती स्वतः खेळ खेळताना दिसणार आहे. मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत, श्रावणीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला तातडीने दुर्मिळ अशा ‘ब्लड ग्रुप’ची गरज भासते. अशा कठीण समयी, श्रावणीने भूतकाळात ज्या गरीब महिलेला मदत केली होती, ती महिला मदतीसाठी धावून येणार आहे. तर दुसरीकडे, कथानकात एक अनपेक्षित वळण येणार आहे. जेलमधून पळालेली वैशाली मृत अवस्थेत आढळते. या घटनेमुळे रुद्र प्रचंड संतापला असून विश्वंभर पूर्णपणे कोलमडून गेला आहे. श्रावणी आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना, शुभ भावूक होऊन तिच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो. प्रकृती सुधारत असताना शुभ आणि श्रावणी एकमेकांच्या अधिक जवळ येणार आहेत. रुग्णालयातून घरी परतल्यावर श्रावणी आपल्या वडिलांना सुबुबद्दल सांगण्याचे ठरवते. मात्र, तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत विश्वंभर श्रावणीचं रुद्रवर प्रेम असल्याचं समजतात, या मोठ्या गैरसमजामुळे नात्यांमध्ये एक नवीनच पेच निर्माण होणार आहे. नात्यांचा हा गुंता आणि श्रावणीच्या आयुष्यातील हा नवा संघर्ष प्रेक्षकांसाठी नक्कीच खिळवून ठेवणारा ठरेल. तेव्हा ‘शुभ श्रावणी’चे आगामी भाग पाहायला विसरू नका, दररोज संध्या ६:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
मुंबई उपमहापौर संजय घाडी यांनी सूर्यकांत वगळ हॉस्पिटलची केली पाहणी
मुंबई प्रतिनिधी
मुंबई प्रतिनिधी गिरगाव, जावबावाडी येथील सूर्यकांत वगळ प्रस्तुतिगृह्यामध्ये विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. याबाबत स्थानिक नागरिकांनी सूचना केल्यावर मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी आज या रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांना स्थानिक नागरिकांनी या प्रसितिगृहामध्ये विविध सोयी सुविधांचा अभाव असून या प्रसूतीगृहाची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती होणे फार गरजेचे आहे. तसेच रुग्णालयामध्ये नर्सिंग स्टाफ देखील कमी असल्याने या ठिकाणी रुग्णांना सोयी सुविधा पुरवणे फार अवघड होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णांनी या प्रसूतीगृहाची त्वरित दुरुस्ती करावी अशी सूचना उपमहापौर संजय घाडी यांना केली. सूर्यकांत वगळ हे महापालिकेचे प्रसूतीगृह असून हे फार जुने प्रसूतीगृह आहे. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सोयी सुविधांचा अभाव असल्याचे आणि नर्सिंग स्टाफ देखील कमी असल्याचे या पाहणी दौऱ्यामध्ये आढळले. त्यानुसार मी महापालिका प्रशासनाला आदेश दिला असून लवकरच या प्रशुतीगृहाची अद्यावत दुरुस्ती होईल तसेच येथील नर्सिंग स्टाफ देखील वाढवण्यात येतील. त्यामुळे हे रुग्णालय पुन्हा रुग्णांच्या सेवेसाठी सर्व सोयी सुविधायुक्त तयार होईल अशी माहिती मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी या पाहणी दौऱ्या दरम्यान दिली. या दौऱ्यामध्ये शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख दिलीप नाईक, कुलाबा विधानसभा प्रमुख यशवंत कोळेकर, सी विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अलका ससाने, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयाचे डॉक्टर अभिजीत वर्पे, माजी नगरसेवक व शिवसेना उपनेते दिलीप नाईक, प्रसूतीगृहाचे कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
एका महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश
मुंबई प्रतिनिधी मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या विविध प्रश्नांबाबत आज विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.कंत्राटी कामगार व ज्युनिअर कलाकारांच्या कामाचे तास निश्चित करावेत,सकस भोजनाची व्यवस्था, वेतन थेट निर्मात्यांकडून देणे, चित्रीकरण स्थळी स्वच्छता राखणे, महिला कलाकारांसाठी स्वतंत्र कपडे बदलण्याची सुविधा तसेच रात्रीच्या चित्रीकरणानंतर सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली. गेल्या हिवाळी अधिवेशन २०२५ दरम्यान औचित्याच्या मुद्द्याद्वारे चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार व ज्युनिअर कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर प्रशासनाने कार्यवाही न केल्याने आमदार सुनील प्रभू यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाच्या मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत चित्रनगरी प्रशासनाने संबंधित निर्मिती संस्थांना यापूर्वी सूचना देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली.कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनियर कलाकारांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संयुक्त समितीची बैठक घेण्याच्या सूचना यावेळी उपाध्यक्षांनी दिल्या. तसेच, करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अंमलबजावणी अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.राज्यातील सुमारे ५ लाख कंत्राटी फिल्म कामगार व ज्युनिअर कलाकारांच्या हितासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. या बैठकीत आमदार सुनील प्रभू,फिल्म सिटी च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, फिल्मसिटी चे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उप सचिव महेश वाव्हळ तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या आव्हानामुळे सोने बाजार आणि कारागीर महासंकटात
। केतन खेडेकर मुंबई : अमेरिका- इस्त्रायल विरुद्ध इराण युद्ध सुरू असल्याने सोने आणि चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. या युद्धामुळे सोने एक लाख 50 हजार रुपयेच्या वर तोळा झाले असून, चांदी रुपये किलो झाली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून मोठ्या प्रमाणामध्ये सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे लग्नसराईचे बजेट मात्र कोलमडले आहे. तर काहींनी आधीच सोनाराकडे दागिने बनवायला टाकले होते, परंतु या युद्धामुळे भाव प्रचंड वाढल्याने त्यांची आता मोठी पंचाईत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केल्यामुळे जवेरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. तर दुकानांमध्ये ग्राहक नसल्याने या झवेरी बाजारांमधील दुकानातील दुकानदार आणि सुवर्णकार उपासमारीच्या विळख्यात अडकायला सुरुवात झाली आहे. यातील अनेक कारागीर आणि सुवर्णकार हे बंगाल आणि कलकत्ता येथील असल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नामुष्की उडवली असून त्यांचा वाढता कल हा आपल्या गावी जाण्याकडे दिसत आहे. माझ्या मुलीचे लग्न अगदी पाच दिवसावर आले आहे, परंतु सोन्याचा भाव आज दीड लाख प्रति तोळाच्या वर गेल्याने सोने खरेदी करण्यासाठी फार मोठी अडचण येत आहे. लग्नात सोन्याचे महत्त्व असल्याने त्यासाठी आम्ही इथूनतिथून कर्ज काढून आज सोने खरेदि केले. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करू नये असे सांगितल्यामुळे आमच्या घरची काही मंडळी सोने खरेदीच्या विरोधात आहे तर काही मंडळी सोने खरेदी करण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आमची देखील मोठी पंचायत झाली आहे. पण या युद्धामुळे आम्हाल वाढीव दराने सोने खरेदी करावं लागले, याची खंत असल्याची माहिती दिशा मानकामे यांनी दिली. इराण युद्धामुळे वाढलेल सोन्याचा भाव आणखी वाढून दोन लाख होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वाढलेल्या भावामुठं अनेक व्यापाऱ्यांनी चिंता व्यक् केली आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केल्यामुळे सोन्याची आयात आता कमी झाली आहे. त्यामुळे आठ हजार ते दहा हजार कोटीच्या सोन्याची खरेदी विक्री थांबली. त्यामुळं झवेरी बाजारात सोनेही कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यानं आणि भाव वाढल्याने विक्रीही हर्व तेवढी होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देश हितासाठी वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केल्यामुळे आम्ही लोकांना गरज असेल तर सोने खरेदी करा. सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट साठी सोने खरेदी करू नका असे आवर्जून सांगतो. कारण देशी त्याला पहिले प्राधान्य असून बाकी सगळ्या गोष्टी नंतर करता येतील अशी माहिती झवेरी बाजार व्यापारी असोसिएशनच् अध्यक्ष कुमार जैन यांर्न दिली.
शिवाजी पार्क जिमखान्याचे श्री. माधवराव गोठोस्कर सर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवाजी पार्क जिमखानाच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील त्यांच्या घरी भेट दिली. आणि पुरस्कार माधवरावांना प्रदान केला. त्याप्रसंगी उपस्थित असलेले दीपक मुरकर (अध्यक्ष), संजीव खानोलकर (मानद महासचिव), सुनील रामचंद्रन (सहायक महासचिव) आणि अजय पाटणकर (समिती सदस्य).