ताज्या बातम्या
Edit Template
आज तारीख-Friday, September 11, 2026 4:56 pm

नागरी समृद्धी अन् संस्कृतीच्या बळावरच जागतिक शांतता शक्य;<br>जीआयएफ II’ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन



मुंबई प्रतिनिधी
जगभरातील विविध संस्कृती, प्राचीन ज्ञान, परंपरा आणि सामायिक अनुभवांच्या माध्यमातून समकालीन जागतिक भागीदाऱ्या कशा उभारता येतील, यावर मंथन करण्यासाठी ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’च्या दुसऱ्या पर्वाचा (जीआयएफ II) मुंबईत एपी ग्लोबलेतर्फे आयोजित या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्य दूत तसेच एपी ग्लोबलेच्या संचालक जान्हवी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

केवळ इतिहासाकडे वळून न पाहता, प्राचीन संस्कृतींमध्ये दडलेल्या विचारांचा आणि पद्धतींचा उपयोग भविष्यातील जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेवर आणि जागतिक ऐक्यावर भर दिला. ते म्हणाले,
“आजच्या तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागलेल्या जगात केवळ राजकीय संवादाने एकजूट साधता येणार नाही, तर त्यासाठी लोक-ते-लोक संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आर्थिक सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, ही भारताची मूळ विचारसरणी आहे. ब्रिक्ससारखे मंच कोणत्याही युद्धाला किंवा संघर्षाला प्रोत्साहन न देता ‘ग्लोबल साउथ’च्या आकांक्षांना आवाज देतात. जेव्हा राजकीय सहमती मिळवणे कठीण होते, तेव्हा रशिया, चीन, ब्राझील आणि भारतासारख्या प्राचीन संस्कृतींमधील कला, आरोग्य आणि मानवी कल्याणाचे विचार जगाला शांतता व सौहार्दाचा मार्ग दाखवू शकतात.”

परिषदेच्या पहिल्या दिवशी विविध देशांमधील सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील देवाणघेवाणीवर सखोल चर्चा झाली. भारत-ब्राझील संवादात नृत्यांगना आनंदा शंकर जयंत आणि कॅपोएरा मास्टर प्राध्यापक रझा बाबा यांनी नृत्य व शारीरिक हालचालींच्या माध्यमातून सीमापार जोडल्या जाणाऱ्या संबंधांवर प्रकाश टाकला. ‘द फेस ऑफ अ नेशन’ या सत्रात मिस इंडिया वर्ल्ड २०२६ साध्वी सैल आणि मिस युनिव्हर्स ब्राझील २०२४ लुआना कॅव्हलकांटे यांनी सौंदर्य, प्रतिनिधित्व आणि राष्ट्रीय ओळखीवर भाष्य केले. माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांनी क्रीडा हे राष्ट्रीय अभिमानाचे माध्यम कसे आहे, हे पटवून दिले. याशिवाय, भारत-चीन संवादात मार्शल आर्ट्स, कॅलिग्राफी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

एपी ग्लोबलेच्या संचालक जान्हवी पवार यांनी ब्रिक्स राष्ट्रांच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान करण्याच्या संस्थेच्या भूमिकेविषयी सांगताना नमूद केले,
“ब्रिक्स राष्ट्रांशी संवाद साधताना रशियाची अभिजात कला, दक्षिण आफ्रिकेचा उत्साह, ब्राझीलचे नृत्य अन् सौंदर्य आणि चीनची पारंपरिक ज्ञानप्रणाली या सर्वांचा आदर करणे आवश्यक आहे. हाच नागरी वारसा जपत समाजोपयोगी काम करण्यासाठी आमची संस्था कटिबद्ध आहे.”

एकंदरीत, या परिषदेने प्राचीन मूल्यांना आधुनिक नवोपक्रमांशी जोडून अधिक मजबूत आणि समानतेवर आधारित जागतिक भविष्य घडवण्याचा पायंडा पाडला आहे.

Dainik Shivner

Writer & Blogger

Previous Post
Next Post

You May Also Like

  • All Posts
  • क्रीडा
  • ठाणे
  • देश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लाईफस्टाईल
  • विदेश
  • संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsletter

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Unlock Premium Content!

Sign up for our
premium membership today.

Categories

Tags

    ताज्या बातम्या, अपडेट्स आणि विशेष माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.
    “सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या” — Dainik Shivner.

    You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

    महत्वाच्या लिंक

    संपर्क

    आपल्याला जाहिराती, बातम्या, सूचना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास खालील माध्यमांद्वारे संपर्क साधू शकता.

    © 2026 Dainik Shivner News Portal. All Rights Reserved.

    या पोर्टलवरील सर्व बातम्या, लेख, फोटो आणि डिजिटल सामग्रीचे सर्व हक्क सुरक्षित आहेत. कोणतीही सामग्री पूर्वपरवानगीशिवाय वापरण्यास मनाई आहे.

    Website & Portal Design by Anshika Technology