मुंबई प्रतिनिधी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरालगत असलेल्या जनार्दन अपार्टमेंट्स (पुरुषोत्तम वाडी) येथील जवळपास १४० मराठी कुटुंबांना जून २०२२ मध्ये इमारत धोकादायक घोषित करून एका रात्रीत घराबाहेर काढण्यात आले.या अन्यायकारक कारवाई बाबत काल प्रभादेवी येथे स्थानिक रहिवाशांच्या वतीने रस्ता रोको करून जोरदार आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुरू ठेवू अशी माहिती येथील अन्या येथील रहिवाशांनी दिली. सुमारे ६०० रहिवासी आजही स्वतःच्या पैशाने भाड्याच्या घरात राहत असून मागील चार वर्षांपासून आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटाचा सामना करत आहेत. या कालावधीत सर्व रहिवाशांनी मिळून सुमारे २० कोटी रुपये भाडे, डिपॉझिट, स्थलांतर आणि इतर खर्चांवर स्वतःच्या खिशातून खर्च केले आहेत. अनेक कुटुंबांवर कर्जाचा बोजा वाढला असून ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य खालावले आहे. काही रहिवासी आज आपल्यातही नाहीत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागामालक आणि यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असून न्यायालयीन केसेसमुळे सामान्य कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुनर्विकासाबाबत २०२२ मध्ये मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रत्येक रहिवाशाला ५८० चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक बैठका, भेटी आणि घोषणांनंतरही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रहिवाशांनी आपल्या व्यथा आणि चार वर्षांचा संघर्ष जनतेसमोर मांडण्यासाठी परिसरात एक साधा बॅनर लावला होता. त्या बॅनरवर कोणताही राजकीय मजकूर किंवा पक्षाचे नाव नव्हते. तरीही काही मिनिटांत पोलीस आणि महानगरपालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बॅनर हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र महिला रहिवाशांसह सर्व भाडेकरूंनी तीव्र विरोध केल्यानंतर हा प्रयत्न थांबवण्यात आला. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.आज या ६०० रहिवाशांचा एकच सवाल आहे की आश्वासनं अनेक मिळाली, पण न्याय आणि स्वतःचे घर नेमके कधी मिळणार. या संघर्षाला पाठिंबा दर्शवत लवकरात लवकर ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन घेऊन जोपर्यत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील अशी माहितीरयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश शाह पेंडसे यांनी दिली.
*वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद,४ महिन्यांत १५ हजार जणांना चावा
मुंबई प्रतिनिधी वसई-विरार शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि श्वानदंशाच्या वाढत्या घटनांमुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात अवघ्या ४ महिन्यांत १५ हजार श्वानदंशाच्या केसेस समोर आल्या आहेत. वसई-विरार उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि कुत्र्यांनी चावा घेण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत वसई-विरार शहर महानगरपालिकेने (VVCMC) भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. यामध्ये खाजगी संस्थांच्या मदतीने कुत्र्यांची नसबंदी मोहीम जलद गतीने राबवणे आणि त्यांच्यासाठी एक स्वतंत्र शेल्टर होम उभारणे समाविष्ट आहे. *१ लाख कुत्रे, केवळ ३० हजारांची नसबंदी* पालिकेच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई-विरार जुळ्या शहरांमध्ये सध्या अंदाजे १ लाख भटके कुत्रे आहेत. मात्र, यापैकी आतापर्यंत केवळ ३० हजार कुत्र्यांचीच नसबंदी करण्यात पालिकेला यश आले आहे. उर्वरित ७० हजार कुत्र्यांमुळे शहरात त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. *भयानक आकडेवारी समोर* या वर्षाच्या जानेवारी ते एप्रिल या अवघ्या ४ महिन्यांच्या कालावधीत शहरात तब्बल १५ हजार कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. नुकतेच एका ९ वर्षांच्या चिमुकलीचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे आणि रेबीज संसर्ग झाल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वसई-विरारमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि पालिकेच्या कारभाराविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. *वसईत ‘डॉग शेल्टर’ उभारणार* महानगरपालिकेच्या महासभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. वाढत्या दबावानंतर महापौर राजीव पाटील यांनी सांगितले की, कुत्र्यांच्या नसबंदीचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने आता खाजगी संस्था आणि प्राणी कल्याण संघटनांची मदत घेण्याचे ठरवले आहे.
अंध बांधवांसाठी सर्वतोपरी मदत करणार,
आमदार प्रमोद जठार यांचे जाहीर प्रतिपादन
मुंबई प्रतिनिधी अंध बांधवांच्या समस्या फार मोठ्या आहेत. जोपर्यंत आपण त्यांच्या समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत त्या समस्या आपल्याला समजत नाही. अंध बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे जाहीर प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी काळाचौकी येथील एनएसडी औद्योगिक अंधशाळेत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सुग्रास भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले या अंधशाळेमध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना भेट दिलेली आहे. त्यावेळेस कॉलेजमधून आम्हाला या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी एनएसएस च्या माध्यमातून आणले जायचे. तेव्हा आम्हाला त्या प्रोजेक्टचे दहा मार्क मिळायचे. त्यामुळे आमचा या वास्तूसोबत फार जुना संबंध आहे. आज मी या ठिकाणी या परिसराची संपूर्ण पाहणी केली तसेच अंध बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार मी माझ्या आमदार निधीतील पाच लाख रुपये या ठिकाणी या अंध बांधवांच्या विविध कार्यासाठी देणार असे जठार यांनी जाहीर केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमोहत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विविध सामाजिक , शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. रामशेठ ठाकूर यांची दानशूर वृत्ती माझ्या मनाला फार भावते त्यामुळे आपण देखील एखादा चांगला कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त घ्यावा असा माझा मानस होता. हाच दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आम्ही शिवनेर संस्थेच्या वतीने अंध बांधवांसाठी मिष्ठान्न जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये आमदार जठार यांनी उपस्थिती लावून आमचा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आसल्याची माहिती दैनिक शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली. या कार्यक्रमांमध्ये रयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश पेंडसे, विविध सामाजिक कार्यकर्ते अंध विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंध बांधवांसाठी सर्वतोपरी मदत करणार
आमदार प्रमोद जठार यांचे जाहीर प्रतिपादन
मुंबई प्रतिनिधी अंध बांधवांच्या समस्या फार मोठ्या आहेत. जोपर्यंत आपण त्यांच्या समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत त्या समस्या आपल्याला समजत नाही. अंध बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे जाहीर प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी काळाचौकी येथील एनएसडी औद्योगिक अंधशाळेत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सुग्रास भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले या अंधशाळेमध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना भेट दिलेली आहे. त्यावेळेस कॉलेजमधून आम्हाला या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी एनएसएस च्या माध्यमातून आणले जायचे. तेव्हा आम्हाला त्या प्रोजेक्टचे दहा मार्क मिळायचे. त्यामुळे आमचा या वास्तूसोबत फार जुना संबंध आहे. आज मी या ठिकाणी या परिसराची संपूर्ण पाहणी केली तसेच अंध बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार मी माझ्या आमदार निधीतील पाच लाख रुपये या ठिकाणी या अंध बांधवांच्या विविध कार्यासाठी देणार असे जठार यांनी जाहीर केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमोहत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विविध सामाजिक , शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. रामशेठ ठाकूर यांची दानशूर वृत्ती माझ्या मनाला फार भावते त्यामुळे आपण देखील एखादा चांगला कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त घ्यावा असा माझा मानस होता. हाच दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आम्ही शिवनेर संस्थेच्या वतीने अंध बांधवांसाठी मिष्ठान्न जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये आमदार जठार यांनी उपस्थिती लावून आमचा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आसल्याची माहिती शिवनेर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली. या कार्यक्रमांमध्ये रयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश पेंडसे, विविध सामाजिक कार्यकर्ते अंध विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंध बांधवांसाठी सर्वतोपरी मदत करणार
आमदार प्रमोद जठार
मुंबई प्रतिनिधी अंध बांधवांच्या समस्या फार मोठे आहे जोपर्यंत आपण त्यांचे समस्या जाणून घेत नाही तोपर्यंत त्या समस्या आपल्याला समजत नाही. अंध बांधवांचे समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे जाहीर प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी काळाचौकी येथील एनएसडी औद्योगिक अंधशाळेत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले या अंधशाळेमध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना भेट दिलेली आहे. त्यावेळेस कॉलेजमधून आम्हाला या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी एनएसएस च्या माध्यमातून आणले जायचे. तेव्हा आम्हाला त्या प्रोजेक्टचे दहा मार्क मिळायचे. त्यामुळे आमचा या वास्तूची फार जुना संबंध आहे. आज मी या ठिकाणी या परिसराची संपूर्ण पाहणी केली तसेच अंदमानमध्ये समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार मी माझ्या आमदार निधीतील पाच लाख रुपये या ठिकाणी या अंध बांधवांच्या विविध कार्यासाठी देणार असे जठार यांनी जाहीर केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंचायतराज वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विविध सामाजिक , शैक्षणिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. रामशेठ ठाकूर यांची दानशूर वृत्ती माझ्या मनाला फार भावते त्यामुळे आपण देखील एखादा एखादा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त घ्यावा असा माझा मानस होता. हाच दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आम्ही शिवनेरी संस्थेच्या वतीने अंद बांधवांसाठी निष्ठांना जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये आमदार जठार यांनी उपस्थिती लावून आमचा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आसल्याची माहिती शिवनेर संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली. या कार्यक्रमांमध्ये रयत सेवा संघाचे अध्यक्ष मुकेश पेंडसे, विविध सामाजिक कार्यकर्ते अंध विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई मेट्रो-३ मध्ये प्रवाशांचे हाल: बोगद्यातील कोंदट प्रवासाने प्रवाशांच्या संयमाचा अंत
मुंबई प्रतिनिधी:“कोंबडीला खुराड्यात कोंडावे, तशी आमची अवस्था झाली होती,” अशा शब्दांत आज मुंबई मेट्रो-३ (आक्वा लाईन) मध्ये अडकलेल्या प्रवाशांनी आपल्या संतापाची भावना व्यक्त केली. आज दुपारी १२:४५ वाजता धारावी स्थानकावरून सुरू झालेला प्रवास चर्चगेट (मंत्रालय) पर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अक्षरश: दोन तास लागले, ज्यातील सव्वा तास मेट्रो बोगद्यातच ठप्प होती. भुयारी मार्गावर मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवासी बाह्य जगापासून पूर्णपणे तुटले होते. श्वास कोंडणाऱ्या वातावरणात मेट्रो प्रशासनाचे मौन आणि कर्मचाऱ्यांची प्रवाशांप्रती असलेली बेजबाबदार वागणूक यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो थांबल्यानंतर प्रवाशांना मदत करण्याऐवजी मेट्रो कर्मचारी उलट अंगावर धावून जात असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. मेट्रोच्या वायरलेस यंत्रणेवर ‘कोणी मीडियाचा माणूस आहे का किंवा व्हिडिओ काढत आहे का,’ अशी विचारणा वारंवार होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा प्रशासनाला आपली प्रतिमा वाचवण्याची जास्त चिंता असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः धारावी मेट्रो स्थानकावर झीशान नावाच्या दिव्यांग प्रवाशाने ऑनलाईन तिकीट काढूनही, त्याला मदत मिळण्याऐवजी महिला कर्मचाऱ्याच्या उद्धटपणाला सामोरे जावे लागले. या भुयारी मार्गावर अडकल्यानंतर रुग्ण किंवा वयोवृद्ध प्रवाशांची स्थिती काय होत असेल, याचा विचारही प्रशासन करताना दिसत नाही.एकीकडे प्रशासकीय अनास्था तर दुसरीकडे आर्थिक फटका अशा दुहेरी संकटात प्रवाशांना सापडावे लागले. तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो बंद पडूनही ऑनलाईन तिकीट काढलेल्या प्रवाशांना परतावा देण्यास प्रशासनाने साफ नकार दिला. केवळ फिजिकल तिकीट असेल तरच परतावा मिळेल, अशी आडमुठी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढला. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या या मेट्रो मार्गावर वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि मागील पावसाळ्यात वरळी स्थानकात शिरलेले पाणी पाहता, येणाऱ्या काळात मुंबईकरांसाठी हा प्रवास किती सुरक्षित असेल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बस किंवा रेल्वे बंद पडल्यास प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मार्ग उपलब्ध असतो, परंतु मेट्रो-३ च्या बोगद्यात अडकणे म्हणजे प्रवाशांसाठी एक प्रकारे ‘डिजिटल जेल’ ठरत आहे. प्रवाशांच्या सोयीपेक्षा माहिती लपवण्यावर आणि उत्तरदायित्व टाळण्यावर मेट्रो प्रशासनाचा भर असल्याचे आजच्या घटनेवरून प्रकर्षाने जाणवले.
*लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त काळाचौकी अंधशाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांना मिष्ठान्न वाटप*
मुंबई प्रतिनिधी – दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस दिनांक 2 जून रोजी आहे. त्यानिमित्त दैनिक शिवनेरच्या वतीने कॉटन ग्रीन मुंबई येथील अंधशाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांना शुक्रवार दिनांक 22 मे रोजी दुपारी बारा वाजता मिष्ठान्न देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात बोलताना शिवनेरचे संपादक नरेंद्र विश्वनाथराव वाबळे म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. पुन्हा या हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळू नये अशी त्यांची दानशूर वृत्ती आहे. रामशेठ यांना उदंड आयुरारोग्य लाभावे अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. म्हणूनच त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दैनिक शिवनेरच्या वतीने आम्ही सुग्रास भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
महापालिकेच्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट! परवानाधारक सल्लागारांची नियुक्ती होणार
मुंबई प्रतिनिधी : शाळा, रुग्णालये, मार्केट, वॉर्ड कार्यालये यांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतींच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाने व्यापक स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या इमारत विभागाकडून परवानाधारक संरचनात्मक सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.मुंबईतील अनेक महापालिका इमारती ३० ते ७० वर्षे जुन्या असून त्यांपैकी अनेक इमारतींना मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेषतः महापालिकेच्या शाळा, आरोग्य केंद्रे, रुग्णालये आणि विभागीय कार्यालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ संरचनात्मक सल्लागारांचे स्वतंत्र पॅनल तयार करून इमारतींची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या सल्लागारांमार्फत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, दुरुस्तीचा खर्च, पुनर्बांधणी आराखडे, भूकंपरोधक क्षमता, अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. जुन्या व धोकादायक इमारतींच्या दुरुस्ती, पुनर्वसन आणि नव्या इमारतींच्या बांधकामाला यामुळे गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महापालिकेच्या मालमत्तांमध्ये शाळा, रुग्णालये, प्रशासकीय कार्यालये, दवाखाने, बाजार इमारती आणि इतर सार्वजनिक वापराच्या वास्तूंचा समावेश असून त्यांची संरचनात्मक सुरक्षितता तपासून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. नव्या इमारतींसाठी आधुनिक, सुरक्षित आणि भूकंपरोधक डिझाइनला प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.असे होणार काम-जुन्या इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीला प्राधान्य– शाळा, रुग्णालये आणि कार्यालयांची संरचनात्मक तपासणी– स्वतंत्र स्ट्रक्चरल सल्लागारांचे पॅनल तयार होणार– नव्या इमारतींसाठी आधुनिक व सुरक्षित डिझाइन– भूकंपरोधक व अग्निसुरक्षा निकषांवर विशेष भर– पुनर्वसन आणि पुनर्बांधणी प्रकल्पांना गती मिळणार
अपना बाजार रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अपना बाजारचा ७८ वा वर्धापन दिन रक्तदान शिबिराचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर पर्यटन तसेच मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अपना बाजार को-ऑप. सोसायटीच्या विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून तब्बल २८७ युनिट रक्तसंकलन करण्यात आले. दादर (पूर्व) येथील अपना बाजारच्या मुख्य कार्यालयात नुकत्याच आयोजित केलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली. यावर्षी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये रक्तसाठा चिंताजनक पातळीवर असताना, या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या शिबिरासाठी तरुण मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात नागरिकांनी उत्साहाने रक्तदान करत ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अंमलात आणला. अपना बाजार चे अध्यक्ष श्री. अनिल गंगर यांनी सांगितले की, “मुंबईत रक्ताचा तुटवडा असताना समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला. एका रक्तदानातून तीन दिवस जीव वाचू शकतात, ही जाणीव समाजात अधिक दृढ व्हावी हा यामागील उद्देश आहे.” वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. नितीन दळवी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. आमदार कालिदास कोळंबकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, स्वीकृत नगरसेविका माधुरी मांजरेकर आदी मान्यवरांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली. या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व रक्तदाते, कर्मचारी, स्वयंसेवक आणि आयोजन समितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. समाजहितासाठी यापुढेही अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. जगदीश नलावडे यांनी सांगितले.
अपना बाजारचा अपना रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई प्रतिनिधी : अपना बाजारचा ७८ वा वर्धापन दिन रक्तदान शिबिराचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर पर्यटन तसेच मुंबईत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अपना बाजार को-ऑप. सोसायटीच्या विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून तब्बल २८७ युनिट रक्तसंकलन करण्यात आले. दादर (पूर्व) येथील अपना बाजारच्या मुख्य कार्यालयात नुकत्याच आयोजित केलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली. यावर्षी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये रक्तसाठा चिंताजनक पातळीवर असताना, या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या शिबिरासाठी तरुण मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात नागरिकांनी उत्साहाने रक्तदान करत ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अंमलात आणला. अपना बाजार चे अध्यक्ष श्री. अनिल गंगर यांनी सांगितले की, “मुंबईत रक्ताचा तुटवडा असताना समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला. एका रक्तदानातून तीन दिवस जीव वाचू शकतात, ही जाणीव समाजात अधिक दृढ व्हावी हा यामागील उद्देश आहे.” वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. नितीन दळवी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. आमदार कालिदास कोळंबकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, स्वीकृत नगरसेविका माधुरी मांजरेकर आदी मान्यवरांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली. या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व रक्तदाते, कर्मचारी, स्वयंसेवक आणि आयोजन समितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. समाजहितासाठी यापुढेही अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. जगदीश नलावडे यांनी सांगितले.



