केतन खेडेकर -ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची जनता दरबारात भेट घेतली. दरम्यान यावेळी जनतेने विश्वास देणारी त्यांच्या कार्याची झलक अनुभवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांचा जनता दरबार आजही प्रचंड गर्दीत पार पडला. आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देत आणि काहींच्या समस्या ऐकून त्यावर काय उपाययोजना करता येईल याबद्दल संवाद साधत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. अनेक शिष्टमंडळ, अनेक वैयक्तिक समस्या तर काहींच्या विकासकामांच्या समस्या घेऊन आलेले लोक या जनता दरबारात पहायला मिळाले. छांव फाऊंडेशनचे संस्थापक आलोक दीक्षित, ॲड. पूजा मोती तसेच ॲसिड हिंसाचारातून संघर्ष करत नव्याने आयुष्य उभारणाऱ्या महिलांनी ॲसिड विक्रीवर कठोर नियंत्रण, प्रभावी देखरेख आणि कडक नियम करण्याबाबतचे निवेदन यावेळी श्रीमती सुनेत्रा पवार यांना दिले. आयुष्यात कठोर संघर्ष करणाऱ्या महिलांच्या वेदना आणि अपेक्षा एका संवेदनशील महिला नेतृत्वापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या शिष्टमंडळाने केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी आलेल्या प्रतिनिधींचे आत्मियतेने म्हणणे ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण समाजाला अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनविणारा आहे. त्यांच्या सन्मानपूर्ण पुनर्वसनासाठी, सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षित समाजाच्या निर्मितीसाठी महायुती सरकार कटिबद्ध असून आवश्यक ती सकारात्मक पावले उचलली जातील असा विश्वास सुनेत्रावहिनी पवार यांनी छांव संस्थेला दिला.
आचारसंहितेत धोरणात्मक निर्णय जाहीर कसे केले ?
निवडणूक आयोग कारवाई करणार का ?
काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा परखड सवाल*
मुंबई प्रतिनिधी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांची ‘कर्जमाफी’ व नाशिकच्या कुंभमेळाव्यानिमित्त तपोवनासाठी आर्थिक तरतूद या गोष्टींना आमचा आक्षेप नाही. परंतु, महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या निमित्तानं आचारसंहिता लागू असताना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती नेमक्या निवडणूक काळातच कशा जाहीर केल्या जातात असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी विचारला आहे. याशिवाय नाशिकची निवडणूक सत्ताधा-यांना अडचणीची जाऊ लागताच तपोवनसाठी २ हजार कोटीची राज्य सरकारने मंजुरी दिली. पाठोपाठ शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटीच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला. यातील धक्कादायक बाब म्हणजे आचारसंहितेमुळे सदर निर्णय जाहीर केले जाणार नाहीत असे बैठकीत सांगितले गेले असताना सर्व प्रसार माध्यमांना याबाबतची इत्यंभूत माहिती कोणी व कशी दिली ? याची चौकशी निवडणूक आयोगाने केली पाहिजे असेही गाडगीळ यांनी म्हंटले आहे. निवडणूक नियमांचे यामुळे एकप्रकारे उघड उल्लंघन होत असतानाही राज्य निवडणूक आयोग, डोळ्याला पट्टी लावून बसणार की याबाबत कारवाई करणार असा परखड सवालही गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेना व राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न
मुंबई : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, या संदेशाचा प्रसार करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिवस्वराज्य सेना व वर्ल्ड वाईड ह्यूमन राईट्स ए.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रिं. वामनराव महाडिक उद्यान, परळ येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवसेना युवा नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, वर्ल्ड वाईड ह्यूमन राईट्स ए.एफ.चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांच्या सूचनेनुसार आणि शिवसेना राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी पर्यावरणाचे रक्षण, वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याची गरज यावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमासाठी एफ-साऊथ विभागाच्या महापालिका प्रशासनाकडून विशेष सहकार्य लाभले. गार्डन विभागाच्या अधिकारी सौ. शर्वरी घोलप मॅडम, श्री. भोसले सर तसेच कॉन्ट्रॅक्टर श्री. पटेल सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.याप्रसंगी शिवसेना शिवडी विधानसभा महिला विभाग प्रमुख व शिवस्वराज्य सेनेच्या सचिव सौ. रेशमा सकपाळ गावकर, वर्ल्ड वाईड ह्यूमन राईट्स ए.एफ.चे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. मोहन वायदंडे, शिवस्वराज्य सेनेच्या राज्य प्रवक्ता सौ. सुषमा सकपाळ राऊत, नेरूळ शहर अध्यक्ष श्री. धनाजी जगताप, राष्ट्रीय केबल सेनेचे सचिव श्री. राजेश जैन, शिवसेना दक्षिण मुंबई ग्राहक तक्रार निवारण कक्ष संपर्क प्रमुख श्री. जगदीश नलावडे, स्थानीय लोकाधिकार सेनेचे उपाध्यक्ष श्री. दीपक कलिंगन, स्वाद केटरर्सचे सर्वेसर्वा श्री. नितीन कोलगे, लायन दिलीप वरेकर, लायन नीरजा सकपाळ, लायन नंदकुमार बागवे, लायन संजू सासमाल, श्री. नील सकपाळ, श्री. सोपान शेट्ये यांच्यासह अनेक शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्यात आले. भविष्यातही अशाच लोकहितकारी व पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे समाजसेवेचा वसा कायम ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
मनसेचे भायखळा येथील वॉर्ड अध्यक्ष किरण टाकळे यांचा शिवसेनेत प्रवेश
केतन खेडेकर भायखळा विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्र. २०८ चे शाखाध्यक्ष किरण टाकळे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेना उपनेते यशवंत जाधव आणि स्थापत्य समिती अध्यक्षा यामिनीताई जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रेरित होऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी किरण टाकळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून जनसेवा, विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कार्य करण्याच्या त्यांच्या संकल्पाचे स्वागत करत त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. टाकले यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा यावेळी संकल्प व्यक्त केला.या पक्षप्रवेशामध्ये उपशाखा अध्यक्ष संतोष तांबोळी, संदीप साळुंखे, महेश शिंदे, कैलास पटेल, गणेश दिघे, गटाध्यक्ष सिद्धेश हांडे, आकाश दीक्षित, महाराष्ट्र सैनिक जीवन दंत, संतोष सिंग, सिद्धेश कुरपे, कल्पेश पाटेकर, पंकज जैस्वाल, यज्ञेश चव्हाण, सचिन कुरपे, बाळा नवघणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली.भायखळा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या जनाधारात सातत्याने होत असलेली वाढ, पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवरील जनतेचा दृढ विश्वास आणि मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरील निष्ठा यांचे हे आणखी एक प्रभावी उदाहरण असून, या पक्षप्रवेशामुळे भायखळा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना संघटना अधिक सक्षम व बळकट होणार असल्याचा विश्वास यावेळी *उपविभागप्रमुख परेश कुवेसकर* यांनी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी मा. सिनेट सदस्य निखिल यशवंत जाधव, उपविभागप्रमुख परेश कुवेसकर, उपसमन्वयक संकेत सांगळे, शाखाप्रमुख राजा म्हात्रे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीएलओ, एसआयआर ड्युटीविरोधात शिक्षकांचा एल्गार: राज्यभर आंदोलनाची तयारी; मुंबईत आज निर्णायक बैठक
मुंबई प्रतिनिधी: राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होत असताना शिक्षकांवर वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्याविरोधात शिक्षक भारती संघटनेने जोरदार भूमिका घेतली आहे. “आम्हाला बीएलओ आणि एसआयआर ड्युटी लागू नाही. आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या,” अशी ठाम मागणी करत संघटनेने राज्यभरातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. शिक्षक भारतीच्या मते, शाळा सुरू होण्याच्या तोंडावर शिक्षकांपुढे अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक जबाबदाऱ्या आहेत. नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणे, प्रवेशासाठी घरभेटी देणे, नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचे नियोजन करणे, विविध विषय समित्या व सांस्कृतिक समित्यांची स्थापना करणे, पालक सभांचे आयोजन करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नियोजन करणे ही शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी आहे. संघटनेने स्पष्ट केले की, मराठी व प्रादेशिक माध्यमांच्या तसेच अनुदानित शाळांच्या अस्तित्वासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि शाळांचे अस्तित्व टिकवणे यासाठी शिक्षकांचे संपूर्ण लक्ष शैक्षणिक कार्यात केंद्रित असणे आवश्यक आहे. मात्र, बीएलओ (Booth Level Officer) आणि एसआयआर (Special Intensive Revision) यांसारख्या निवडणूक व मतदार यादीसंबंधित कामांमध्ये शिक्षकांना गुंतविल्यामुळे शिक्षण प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले की, “शिक्षकांची नियुक्ती विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी झाली आहे. निवडणूक आणि प्रशासकीय स्वरूपाच्या कामांमध्ये शिक्षकांना अडकविणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे. सरकारने शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करून त्यांना पूर्णवेळ शिक्षणासाठी उपलब्ध करून द्यावे.” या पार्श्वभूमीवर शिक्षक भारती संघटनेच्या वतीने मंगळवारी, ९ जून रोजी सकाळी ११.३० वाजता लोअर परेल येथील ग्लोब मिल म्युनिसिपल स्कूलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता भार, बीएलओ/एसआयआर ड्युटीचा प्रश्न, शिक्षकांचा सन्मान आणि पुढील आंदोलनाची दिशा याबाबत चर्चा होणार असून महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. संघटनेने राज्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “आपण एकत्र आलो तर पालक आणि समाजदेखील आपल्या न्याय्य मागण्यांच्या बाजूने उभा राहील,” असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा आणि त्याचा शिक्षण व्यवस्थेवर होणारा परिणाम हा राज्यभर चर्चेचा विषय बनला असून, शिक्षक भारती संघटनेच्या या भूमिकेकडे आता शिक्षण विभाग आणि राज्य सरकार कोणत्या दृष्टीने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांनी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं आमदार डॉक्टर चित्रा वाघ
मुंबई प्रतिनिधीआपल्याला आपल्या स्वतःवर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही परंतु स्वतःवर स्वतः प्रेम करायला शिकवणारा नेतृत्व म्हणजे डॉक्टर जगन्नाथराव हेगडे असे जाहीर प्रतिपादन भाजपा आमदार डॉक्टर चित्राताई वाघ यांनी डॉक्टर जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले मी गेली 28 वर्षे डॉक्टर हेगडे यांच्या वाढदिवसाला आवर्जून येत असते. हेगडे यांचे कार्यक्रमाला उपस्थित राहणे म्हणजे आपल्या घरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासारखे असून मी जेव्हा जेव्हा त्यांच्या वाढदिवसाला येते तेव्हा तेव्हा ते आणखीनच चलन होत चाललेले मला पाहायला मिळतं. निस्वार्थीपणे समाजात काम करणाऱ्या माणसांच्या यादीत जगन्नाथराव हेगडे यांचे नाव पहिले असेल. समाजात वावरताना त्यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य केले आहे. त्यांचे कार्य गेल्या 28 वर्षे मी माझ्या डोळ्यांनी पाहत आले आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते. डॉक्टर जगन्नाथ राव हेगडे हे असं रसायन आहे की ते कधीही संपत नाही. डॉक्टर हेगडे यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते आणि हे स्मितहास्याच त्यांना समाजात ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा देते. डॉक्टर हेगडे यांचा वाढदिवस सात जूनला येतो ही तारीख आम्ही नवीन वर्षाची डायरी घेतल्यावर त्यामध्ये नोंद करून ठेवतो आणि त्यांचे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो. मी देवाकडे त्यांना त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त मी उपस्थित राहावे यासाठी प्रार्थना करतो अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या कार्यक्रमात दिली. या समारंभात हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेचा पारितोषिक समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, नगरसेवक अनिल कोकीळ, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, नगरसेविका सुप्रिया दळवी , विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी माणसांना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ न्याय देणारच
माजी खासदार गजानन कीर्तिकर
मुंबई प्रतिनिधी
मराठी माणसांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये मानाचे स्थान मिळवून देणारच असे जाहीर प्रतिपादन काही लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनीएन.पी.सी.आय.एल. (NPCIL) स्थानीय लोकाधिकार सेना स्थापना सोहळा नुकताच महालक्ष्मी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले शिवसेनेमुळे आज मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे. अनेक सरकारी आणि खाजगी कंपन्यांमध्ये मराठी माणसाला शिवसेनेमुळे मनाचे स्थान मिळाले आहे. शिवसेना नेहमीच कामगारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे आणि यापुढेही उभी राहील.गजा भाऊ हे आम्हाला वटवृक्षाप्रमाणे असून त्यांचा कामगार क्षेत्रातील अनुभव फार दांडगा आहे. त्यांनी एवढी वर्ष कामगार क्षेत्रात कामगारांसाठी व्यतित केले असून त्याचा उपयोग नक्कीच आम्हाला आमच्या या एन पी सी आय एल कंपनीसाठी होईल. या कंपनीमध्ये अनेक कामगार कंत्राटी पद्धती वरती 17 – 18 वर्षे काम करत आहेत. त्यांचा परमनंट चा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यासाठी आम्ही लवकरच बैठक आयोजित करणार असून या सर्व कामगारांना आम्ही न्याय देऊ अशी माहिती शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी या कार्यक्रमात दिली. नव्याने स्थापन झालेल्या एन.पी.सी.आय.एल. स्थानीय लोकाधिकार सेनेच्या अध्यक्षपदी माजी खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली.स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ हे स्थापना झाल्यापासून अगदी जोशात काम करत आहे. स्थापनेच्या दिवशीच 28 आस्थापनामध्ये आम्ही स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या माध्यमातून शुभारंभ केला. अनेक कामगारांचे प्रश्न आम्ही या एका वर्षातच सोडवले. त्यामुळे मोठ्या संख्येने खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील अनेक कंपन्या या स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाकडे आकर्षित होत आहेत. कामगारांप्रती जाणीव असलेली स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ ही गजानन कीर्तिकर यांच्या लोक मार्गावर विश्वास ठेवून काम करत आहे आणि यापुढेही काम करत राहील असे जाहीर प्रतिपादन स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे यांनी या कार्यक्रमात केले. यावेळी एन.पी.सी.आय.एल. स्थानीय लोकाधिकार सेनेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार तुकाराम काते, शिवसेना दक्षिण मुंबई लोकसभा सहसंपर्कप्रमुख दिलीप नाईक, उपाध्यक्ष संतोष बामणे, चिटणीस करन ठाकूर, शिवसेना वैद्यकीय पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य जितेंद्र सकपाळ यांच्यासह स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील पर्यावरणीय पुनर्संचयितीकरण प्रकल्प — कचरा डेपोचे सजीव जंगलात रूपांतर
मुंबई प्रतिनिधी मुंबईची पर्यावरणीय लवचिकता अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड आणि ब्राझीलस्थित लारा सेंट्रल डी ट्रॅटामेंटो डी रेसिड्युओस लिमिटेड यांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या विशेष उद्देश वाहन (SPV) अँटनी लारा एन्व्हायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आज ‘रीरूट’ या अभिनव शहरी वननिर्मिती उपक्रमाचा शुभारंभ केला. हा उपक्रम आशियातील सर्वात मोठ्या एकाच ठिकाणी असलेल्या कचरा प्रक्रिया केंद्रांपैकी एक असलेल्या कांजूरमार्ग कचरा प्रक्रिया प्रकल्पात राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मधील वरिष्ठ अधिकारी आणि आघाडीचे पर्यावरण वैज्ञानिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या प्रकल्पांतर्गत 15,000 स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, मुंबईच्या सुमारे 90% महानगरपालिका कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या या परिसराचे रूपांतर दाट आणि स्वयंभू शहरी जंगलात केले जाणार आहे. ही नवीन वृक्षलागवड सध्या परिसरात अस्तित्वात असलेल्या 12,800 वनस्पतींना पूरक ठरेल.15,000 लागवड करण्यात येणारेस्थानिक वृक्ष असून यातून ~330 टन दरवर्षी शोषले जाणारेCO₂ 9,000–12,000 टन30 वर्षांत साठवले जाणारेCO₂25 वर्षे शाश्वत कार्याचाअनुभव या कचरा प्रक्रिया केंद्रापासून सजीव परिसंस्थेकडे असणार आहे.हा प्रवास एका ओसाड खारफुटीच्या जमिनीपासून सुरू झाला. आज हे मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या कचरा व्यवस्थापन केंद्रांपैकी एक आहे. आता ते एका समृद्ध शहरी परिसंस्थेत रूपांतरित होणार आहे. पूर्ण विकसित झाल्यानंतर, हे शहरी जंगल दरवर्षी सुमारे 330 टन CO₂ शोषून घेईल आणि पुढील 30 वर्षांत अंदाजे 9,000–12,000 टन CO₂ साठवून ठेवेल. त्यामुळे मुंबईच्या शहरी परिसरात एक महत्त्वपूर्ण दीर्घकालीन कार्बन सिंक निर्माण होईल.कार्बन शोषणाव्यतिरिक्त, हा प्रकल्प परिसरातील नागरिकांना अनेक ठोस पर्यावरणीय लाभ देईल. यात स्थानिक तापमानात 2–5°C पर्यंत घट, नैसर्गिक धूळ गाळणीद्वारे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, पक्षी, फुलपाखरे आणि परागीकरण करणाऱ्या कीटकांचे पुनरागमन, तसेच उष्णता, धूळ आणि पृष्ठभागावरील पाण्याचा प्रवाह कमी करणे यांचा समावेश आहे.या वनात नीम, अर्जुन, जांभूळ, वड, पिंपळ, करंज आणि बांबू यांसह सातपेक्षा अधिक स्थानिक आणि हवामान-प्रतिरोधक वृक्षप्रजातींचा समावेश असेल. या प्रजाती मिळून विविध स्तरांची वनस्पती रचना तयार करतील, ज्यामुळे जैवविविधतेला चालना मिळेल, मातीचे आरोग्य सुधारेल आणि हवामान बदलांप्रती लवचिकता वाढेल.या प्रसंगी बोलताना, श्री. शिजू अँटनी, मुख्य शाश्वतता अधिकारी, अँटनी वेस्ट ग्रुप, म्हणाले:“कचरा व्यवस्थापनाचे मूल्यमापन अनेकदा आपण काय हटवतो यावर केले जाते. हे जंगल मात्र आपण काय निर्माण करू शकतो हे दाखवते. 15,000 स्थानिक वृक्षांची लागवड करून आम्ही आमच्या कचरा प्रक्रिया केंद्राच्याच एका भागाचे रूपांतर अशा परिसंस्थेत करत आहोत, जी पुढील अनेक दशकांपर्यंत पर्यावरण, जैवविविधता आणि स्थानिक समुदायांना लाभ देईल.”शहरी पायाभूत सुविधांच्या जबाबदाऱ्यांची नव्याने व्याख्याभारतभरातील शहरे जलद शहरीकरण आणि हवामान बदल या दुहेरी आव्हानांना सामोरे जात असताना, हा उपक्रम दाखवून देतो की अत्यावश्यक शहरी पायाभूत सुविधा पर्यावरणीय पुनर्संचयितीकरणात अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात. मुंबईमध्ये दररोज 7,000 टनांहून अधिक महानगरपालिका कचरा निर्माण होत असून हवामानाशी संबंधित दबावही वाढत आहेत. अशा परिस्थितीत हा प्रकल्प शहरी पायाभूत सुविधांमध्ये पर्यावरणीय पुनर्संचयितीकरण समाविष्ट करण्यासाठी एक अनुकरणीय नमुना ठरतो.
साथी जॉर्ज फर्नांडिस चौक नामफलक अनावरण कार्यक्रमात सरकारचा दुजाभाव उघड
मुंबई, प्रतिनिधी मुंबई शहरात आज पर्यंत हजारो रस्ता,चौक यांना नावे देण्याची कार्यक्रम चाहत्यांच्या मोठ्या गर्दीत संपन्न झाले आहेत. अनेक मोर्चे, आंदोलने रस्त्यावर होत असतात, फेरीवाल्यांनी मुंबईतला प्रत्येक पदपथ व रस्ता अडवलेला आहे.असे चित्र असताना काल फोर्ट मधील एका चौकाला अधिकृतरित्या समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते, कामगारांचे कैवारी, ‘बंद सम्राट’, माजी रेल्वेमंत्री, माजी संरक्षणमंत्री, कोकण रेल्वेचे सहशिल्पकार जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव देण्याच्या समारंभासाठी उभारण्यात आलेला मंच पोलिसांनी काढायला भाग पाडून जॉर्ज फर्नांडिस यांच्या देशसेवेचा अपमान केल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली व पोलिसांचा निषेधही केला. पद्मविभूषण साथी जॉर्ज फर्नांडिस यांची काल जयंती होती. मुंबई महानगरपालिकेने कुलाबा येथील एका चौकास “पद्मविभूषण साथी जॉर्ज फर्नांडिस चौक” असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे म्युनिसिपल इंजिनियर असोसिएशन ने काल बुधवारी ३ जून २०२६ रोजी जयंतीदिनी नामफलक लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी पालिका व वाहतूक पोलिसांकडून कार्यक्रमाची रीतसर परवानगी घेतलेली होती.असे असताना एम आर ए मार्ग पोलिसांनी तेथे उभारण्यात आलेले १५ × १० फूट व्यासपीठ ऐनवेळी काढून टाकण्याचा तगादा लावून ते हटविण्यास आयोजकास भाग पाडले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्ते, महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि कामगारांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. देशाच्या राजकारणात आणि कामगार चळवळीत अमूल्य योगदान देणाऱ्या, लोकशाही रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्या आणि केंद्रीय मंत्री म्हणून देशसेवा करणाऱ्या साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावाने आयोजित कार्यक्रमातच अशा प्रकारे अडथळे निर्माण होणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून त्यांच्या स्मृतीबाबत शासनाच्या उदासीन आणि दुजाभावाच्या भूमिकेचे प्रतीक असल्याची भावना कामगाराढे निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. हा कार्यक्रम महापालिकेच्या वतीने साजरा करायला पाहिजे होता पण त्यांनी तो केला नाही उलट हा आमचं कार्यक्रम नाहीं असं ते सांगत होते. असे आयोजकांनी सांगितले. देशातील अनेक नेत्यांच्या स्मृती जपण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात. मात्र साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याच्या नावाने आयोजित कार्यक्रमाला आवश्यक परवानग्या असूनही अडथळे आणले गेले हा गंभीर प्रश्न आहे. हा प्रकार त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कामगार व सामान्य नागरिकांच्या भावनांचा अवमान करणारा आहे. समस्त महापालिका अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि कामगार या घटनेचा तीव्र निषेध करीत असून शासनाने याबाबत तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “साथी जॉर्ज फर्नांडिस हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर संघर्ष, कामगार हक्क आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक होते. त्यांच्या स्मृतीबाबत कोणताही दुजाभाव आम्ही सहन करणार नाही.” असा इशारा उपस्थित समस्त महापालिका अभियंते, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी दिला आहे.
गिरगाव येथील बीमा सखी’ मार्गदर्शन शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या मनातील महत्वाकांक्षी संकल्पना आणि राज्याच्या समस्त भगिनींचा लाडका भाऊ, महिला सक्षमीकरणासाठी कायम अग्रेसर असलेले संवेदनशील आणि कणखर नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दक्षिण मुंबई विभागाच्या वतीने आयोजित ‘बीमा सखी’ महिला करिअर मार्गदर्शन व भरती मोहिमेला गिरगाव येथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत विविध प्रश्न विचारून विमा क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.या कार्यक्रमात २५ वर्ष विमा एजन्ट म्हणून यशस्वी कारकीर्द असलेल्या निलेश भोईटे आणि कमालक्षी उसपकर यांचा सत्कार करण्यात आला. रुपाली पै, रणजित गुजर आणि शोएब शेख या वरिष्ठ एल.आय.सी. अधिकाऱ्यांनी विमा व्यवसायातील उत्पन्नाच्या संधी, प्रशिक्षण प्रक्रिया आणि करिअर विकासाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश शाह यांनी केले तर दिलीप नाईक यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्धेश सांगितलं. या प्रसंगी विधानसभा संघटक प्रसाद गवाणकर, समीक्षा फोपले, पद्मजा वेदपाठक, उपविभाग प्रमुख संकेत नेवशे, शाखाप्रमुख कविता मल्हार, स्वाती राणे, कल्पना आमले उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी चर्चेत सहभागी होत आत्मनिर्भर होण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून अनेक महिलांना नवीन करिअरचा मार्ग आणि आत्मविश्वास मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. ‘बीमा सखी’ उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

